

प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील पूर्वपट्ट्यांमध्ये भुईमुगाच्या शेंगा काढणीस पावसाने दडी मारल्यामुळे खरपुडी बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भुईमुगाच्या शेंगांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या वर्षी पेक्षाही यावर्षी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. असे स्पष्ट मत
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेल अध्यक्ष मोहन भगत यांनी व्यक्त केले आहेत. तसेच काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाही. मजुरीचे दर देखील गगनाला भिडलेले आहे. वाढते बियाण्याचे भाव ,औषध रासायनिक खते यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यातच पावसाने दिलेला त्रास. या शेत मालास योग्य असा रास्त भाव मिळावा त्यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर पंचनामे करावे अशा प्रकारचे स्पष्ट मत शेतकरी वर्गाकडून येत आहे.